अंजनगाव सुर्जीमध्ये शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे. बूस्टर आणि ओसवाल कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरूनही अपेक्षित उगवण न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे बाधित शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीविरोधात कारवाई करण्याची आणि तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. विदर्भातील इतर भागांतही अशाच प्रकारच्या तक्रारी समोर येत असल्याचे वृत्त आहे.
📺 महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी G9 Maharashtra ला Subscribe करा.

